अर्थकारण
अर्थकारण
जगाच्या आणि राष्ट्राच्या संपत्ती आणि संसाधनामध्ये स्त्रियांचा अर्धा वाटा असला पाहिजे. वास्तवात तो अत्यल्प आहे. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला.भटकता माणूस घरादारात स्थिरावला. परंतु नांगराचा शोध लावून तो पुरुषांनीच हाती धरला आणि शेती स्त्रियांच्या हातात राहिली नाही.तिला श्रमाचा मोबदला तर मिळाला नाहीच उलट, नव्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना गुलामी सदृश्य दुय्यम नागरिकत्व लाभलं. हे भांडवली षडयंत्र उलथून टाकण्यासाठी धोरणात्मक पातळीवर अर्थकारणामध्ये स्त्रियांचा वाटा मिळण्यासाठी त्यांना आजवर विनामोबदला केलेल्या घरकामाला वेतन आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.घर स्त्री पुरुषांचे तर घरकामही दोघांचं हा विचार ,आचार रुजवायलाच हवा.